मंगळवार, २८ ऑक्टोबर, २००८

खूप दिवसानी आज पोस्ट करत आहे । अणुउर्जा ही वाटते तितकी घटक नाही असे सांगणारे काही लेख वाचण्यात आले आहेत । त्याविषयी नंतर ।

सर्वाना दीपावली सुखाची आणि समाधानाची जावो ।

माधवी

बुधवार, १ ऑक्टोबर, २००८

जर्मनी मध्ये बसवलले फोटोवोल्टेक सेल

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २००८

फोटोवोल्टेक सेल

फोटोवोल्टेक सेल म्हणजे सौर उर्जेचे रूपांतर विद्युत् उर्जेत करणारे यन्त्र । वरच्या आकृतित सौर उर्जेचे विद्युत् उर्जेत कसे रूपांतर होते ते दाखवले आहे।
आकृतित एक मॉड्यूल दाखवले आहे । त्या मॉड्यूलवर किंवा फोटोवोल्टेक सेल वर सूर्यप्रकाश पडतो अणि त्याचे रूपांतर विद्युत् उर्जेत होते, म्हणजे या मॉड्यूल ला जर वोल्ट मीटर लावला तर त्यात वोल्टेज दिसेल .ह्या वोल्टेज नि मग बैटरी चार्ज होइल अणि सौर उर्जा विद्युत् उर्जेत रूपांतरित होइल।
रितेश
हे सर्व रितेश ने मला ईमेल ने पाठवले ते मी पोस्ट केले आहे । अधिक माहिती हवी असल्यास रितेश ला ईमेल करावा ।

बुधवार, २४ सप्टेंबर, २००८

सोमवार, २२ सप्टेंबर, २००८


डॉ अनंत फडके यांचा एक लेख सर्वांसाठी
माधवी
भारताचा खरा प्रश्न हा आहे की ,जरी अणुकरार झाला तरी फक्त ९-१० % उर्जा उपलब्ध होइल । बाकी लागणारी उर्जा आणायची कुठून ? माझे तर असे मत आहे की फक्त सौर उर्जेचा विचार न करता अजुनही काही अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा विचार गाम्भिर्याने केला पाहिजे । दुसरे असे की आज जी अणुउर्जा उपलब्ध होणार आहे तिचा फायदा फक्त श्रीमंत लोकांनाच होणार आहे । सर्वाना परवडेल अशी उर्जा निर्माण करता यायला हवी अणि हेच मोठे आव्हान आपल्यापुढे आज आहे । सौर उर्जा हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो म्हणुन मी सौरुर्जेच्या पक्षात आहे
माधवी

रविवार, २१ सप्टेंबर, २००८

या ब्लॉग वर आता चर्चा सुरु झाली आहे । रितेश असे म्हणतो की पावसाला सोडून इतर सर्व दिवसांत सौर उर्जा हाच प्रभावी पर्याय राहील। रितेशचे म्हणणे मलाही पटले आहे । पण सर्वाना एक विनंती आहे आपली मते शक्यतो मराठी मध्येच पाठवा।

मला आज सुचलेला विचार

सौर उर्जा तयार करायला लागणारे सोलर सेल तयार करण्याची स्पर्धा सरकारने घ्यावी म्हणजे तरुण मुले या क्षेत्रा कड़े आकर्षित होतील

माधवी

शनिवार, २० सप्टेंबर, २००८

भारत स्वतंत्र झाला त्यावेली एकुण सगळे वातावरण अणुउर्जे मुळे भारावलेले होते अणुउर्जा तयार करण्याचे तंत्रज्ञान सहज मिळण्यासांरखे होते डौ होमी भाभा यां सारखे संशोधक अणुउर्जे मुळेच भारताचा विकास होइल अशी आशा मनाशी बाळगुन होते डौ होमी भाभा यांच्या अथक परिश्रमामुळे अणुउर्जा आयोग स्थापन झाला अणुउर्जेवरील संशोधन जोरात सुरु झाले भारत कुणाच्याही मदतीशिवाय अणुउर्जा तयार करू लागला
असे प्रयत्न सौर उर्जेबाबत झाले नाहीत त्या मुळे सौर उर्जा मागे पडली नाही म्हणायला डौ दामोदर कोसंबी सारख्या काही लोकांनी त्यावेली सौर उर्जेच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला पण ते एकटे पडले आता असे वाटते की त्यावेली जर त्यांच्याकडे थोड़े लक्ष दिले असते तर सौर उर्जे वरचे संशोधन तेव्हापासूनच सुरु झाले असते
माधवी
आज भारताचा उर्जा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे तंत्रज्ञान प्रगतीच्या भरधाव निघालेल्या घोड्याला उर्जेची कमतरता खीळ घालू शकते भारत सरकारने उर्जा प्रश्न सुटावा म्हणुन नुकताच अणुकरार केला आहे अणूउर्जेची निर्मिती भारतात खूप वर्षांपासून सुरु आहे अणूउर्जेची निर्मिती करताना एक प्रश्न भेडसवतो तो म्हणजे अणूउर्जा तयार करायला लागणारा कच्चामाल किंवा युरेनियम भारतात फारसे मिळत नाही त्यामुळे भारताला इतर देशांवर अवलंबून रहावे लागते अणूउर्जेचा दूसरा धोका असा की त्यामुळे किरणोत्सार होउन पर्यवरण धोक्यात येऊ शकते आपल्याकडे दूसरा पर्याय नही का ? सौर उर्जेचा विचार भारत सरकार का करत नाही आहे ? सर्व भारत भर सूर्यदर्शन होते सौर उर्जेसाठी लागणारा कच्चामाल आपल्याकडे भरपूर आहे सौर उर्जेमुले पर्यवरण हानीही होत नाही मग असे असताना आपला देश सौर उर्जे कड़े पर्यायी उर्जा म्हणुन का बघत नही या विषयावर चर्चा व्हावी म्हणुन हा ब्लॉग सुरु केला आहे।
माधवी

अणु उर्जा की सौर उर्जा

अणु उर्जा की सौर उर्जा

सौर उर्जा की अणु उर्जा?

नाव: माधवी ठाकुरदेसाई

ब्लॉग : सौर उर्जा की अणु उर्जा?